Ulhasnagar Crime News : जेवणाचं बिल देण्याच्या वादातून ढाब्यावर जोरदार हाणामारी झाली आहे. बिल देण्याच्या वादातून ढाब्याच्या मॅनेजरलाच पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी बेदम मारहाण केली आहे. उल्हासनगरमधील (Ulhasnagar) हील लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ढाब्यावर ही घटना घडली. सदर प्रकरणी ढाब्याच्या मॅनेजरनं पोलिसांत धाव घेतली. पण पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केलेली नसून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. 


उल्हासनगर हील लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ढाब्यावर काही जणांच्या टोळक्यामध्ये जोरदार हाणामारीची घटना घडली. जेवणाचा बिल देण्याच्या वादातून ढाब्याच्या मॅनेजरला पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी बेदम मारहाण केली आहे. मारहाणीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली असताना देखील उल्हासनगर हीललाईन पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 


देवराम वारिंगे आणि त्याचे पाच सहा सहकारी अंबरनाथ तालुक्यातील पालेगाव एमआयडीसी भागातील सागर ढाब्यावर जेवण्यासाठी गेले होते. यावेळी देवराम वारिंगे आणि ढाब्याचा मॅनेजर यांच्यामध्ये जेवणाचा बिल देण्यावरून वाद-विवाद झाले. देवराम वारिंगे आणि त्याच्या पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं जेवणाच्या बिलाच्या वादातून धाब्यातच लाठ्या-काठ्यांनी मॅनेजरला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. त्यानंतर धाब्याचा मॅनेजर उल्हासनगर हील लाईन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला. त्यावेळी पोलिसांनी मात्र कोणतीही ठोस कारवाई न फक्त अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :