Jalna News : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या कल्याणी शिवारामध्ये सापडलेल्या गांजाची 24 तासानंतर ( Jalna Ganja News ) मोजदाद झाली आहे. या छापेमारीमध्ये सापडलेल्या 23 क्विंटल गांजाती एकूण किंमत 2 कोटी 30 लाख रुपये इतकी झाली आहे.


गुरूवारी पारध पोलिसांनी छापा टाकून एका एकरात लावलेली शेकडो गांजाची झाडं जप्त केली होती. आज संपूर्ण मोजदाद झाल्यानंतर जवळपास 2 कोटी 30 लक्ष रुपये किमतीचा 23 क्विंटल गांजा पोलिसांनी जप्त केल्याच स्पष्ट झालं आहे. कल्याणी शिवारात पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकून 725 झाडं पोलिसांनी जप्त केली होती. गुरूवारपासून ट्रॅक्टर लावून पोलिसांनी ही झाडं आणून शुक्रवारी त्याचा पंचनामा पूर्ण करण्यात आला. या प्रकरणी शेतमालक गौस खान पठाण याला पोलिसांनी अटक केली असून पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांना भोकरदन तालुक्यातील कल्याणी गावच्या शिवारामध्ये गाजांची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून एका एकरात लावलेल्या गांजाची झाडं जप्त केली. या कारवाईमध्ये 10 ते 12 फूट वाढलेली 500 ते 600 झाडे जप्त करण्यात आली आहेत. ही गांजाची झाडे ट्रॅक्टरमध्ये टाकून पोलीस या मुद्देमालाचा हिशोब लावला.


याप्रकरणी शेती मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारध पोलीस स्टेशनचे एपीआय चैनसिंग गुसिंगे इतर पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी छापा टाकून गांजाची ही शेकडो झाड जप्त केली.


भारतात गांजावर पूर्णपणे बंदी


भारतात गांजावर पूर्णपणे बंदी आहे. तरीही लोक छुप्या पद्धतीने याची लागवड करतात. काहीजण व्यापार देखील करतात. त्याचे सेवन करतात. अशाप्रकारे आपल्या देशात हजारो वर्षांपासून गांज्याचं सेवन केलं जातं. सन 1985 पर्यंत गांजावर कुठल्याही प्रकारची बंदी नव्हती. पण राजीव गांधी यांच्या सरकारने 1985 मध्ये एनडीपीएस कायदा आणला. या कायद्यानुसार गांजावर बंदी घातली गेली. 


गांजाबद्दल बर्‍याच गोष्टी बोलल्या जातात. एकीकडे गांजाचे तोटे सांगणारे लोक आहेत तर त्याचे फायदे सांगणार्‍यांचीही संख्या बर्‍यापैकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात गांजावरील बंदी हटविण्याची मागणी होत आहे. काही वेळेला तर शेतकऱ्यांनी गांज्याची लागवड करण्याची सरकारनं परवानगी द्यावी अशी देखील मागणी केली आहे. तर अनेकदा शेतकरी नेत्यांनी देखील शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. 


ही बातमी वाचा: