Ahmednagar Crime News : एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी संतप्त जमावाने बेदम चोप दिलेल्या अण्णा वैद्य (वय 58) याचा मृत्यू झाला.अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) अकोले (Akole) तालुक्यातील सुगाव (Sugaon) येथे अण्णा वैद्य राहणारा होता. मच्छिंद्र  उर्फ अण्णा वैद्य हा चार साखळी हत्येतील आरोपी आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 


अण्णा वैद्य हा राज्यभर गाजलेल्या  महिलांच्या खून प्रकरणात शिक्षा भोगलेला आणि काही गुन्ह्यांत निर्दोष मुक्त झाला होता. रविवारी सायंकाळी एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याने त्याला संतप्त जमावाने चोप दिला. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वैद्य याला उपचारासाठी संगमनेर येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 


विद्युत मोटार केबल चोरी प्रकरणात गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर  साखळी खून प्रकरण उजेडात आले होते. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात 2007 च्या दरम्यान चार महिलांची हत्या करून त्यांना शेतात पुरून ठेवल्याचा आरोप अण्णा वैद्य याच्यावर होता. संगमनेर येथील ताराबाई राऊत या 45 वर्षीय महिलेचा हत्या करून पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरून संगमनेरच्या न्यायालयाने वैद्य याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात त्याला जन्मठेप देखील झाली होती. उच्च न्यायालयात नंतर त्याची निर्दोष मुक्तता झाल्यावर तो सुगाव येथे राहत होता. रविवारी सायंकाळी अल्पवयीन मुलीची त्याने छेड काढली आणि त्यामुळे संतप्त जमावाने त्यास मारहाण केली तसेच पोलिसांत तक्रा दिली. या प्रकरणी अकोले पोलिसांत पोक्सो, अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल होत असताना त्याला उपचारासाठी रात्री संगमनेर येथे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.


जमावाच्या हल्ल्यात अण्णा वैद्य याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनेक महिलांच्या हत्येचा आरोप असलेल्या अण्णा वैद्य याचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलीस कारवाई करणार आहे. 


दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही; पतीने पत्नीला संपवले 


दारूच्या व्यवसनात अनेकांचे आयुष्य उद्धवस्त होते. आर्थिक चणचणीपासून ते कुटुंबाची ससेहोलपट दारूमुळे होते. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणाने एकाने आपल्या पत्नीला संपवले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीला (Police Arrested Accused ) अटक केली आहे. मुंबईतील (Mumbai) मालाड (Malad) परिसरात ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


गुरुवारी 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास गोरेगाव ते मालाड रेल्वे स्थानकादरम्यान एका बेकायदा झोपडीत राहणाऱ्या एका व्यक्तीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच बोरिवली जीआरपीने हत्येअंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यावर तातडीने तपास सुरू केला. त्यानंतर अवघ्या चार तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.