Adinath Maharaj Ahilyanagar Crime: अहिल्यानगरच्या तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री (Aadinath Maharaj Shastri) यांना गेल्या रविवारी अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने भाविकांना मोठा धक्का बसला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी अदिनाथ महाराजांवर तातडीची शस्त्रक्रिया (Surgery) केली होती. यानंतर डॉक्टरांनी त्यांना लोकांच्या गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. आदिनाथ महाराज यांना शस्त्रक्रियेनंतर संसर्ग होण्याचा धोका असल्याने डॉक्टरांनी त्याबाबत काळजी घेण्यास सांगितले होते. मात्र, आता एक आठवडा उलटल्यानंतर या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Maharashtra Crime news)

Continues below advertisement

सुरुवातीला महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला का, अशी चर्चा होती. मात्र, या उलटसुलट चर्चांवर पडदा टाकण्यासाठी आदिनाथ महाराजांनी ते जखमी कसे झाले, याचे कारण सांगितले आहे. आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वतःच्याच गुप्तांगावर शस्त्राने वार केले होते. त्यानंतर ते स्वत:च्याच खोलीत पडून होते. कोणीतरी खोलीत गेल्यानंतर आदिनाथ महाराज तिकडे जखमी अवस्थेत दिसून आले होते. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले होते. याबाबत बोलताना आदिनाथ महाराजांनी सांगितले की, जो काही जननेंद्रियाचा त्याग झाला, तो मी स्वतःहून करून घेतला, कोणाचाही काहीच त्रास नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे आता काही शंका उपस्थित झाल्या आहेत. आदिनाथ महाराजांवर काही दबाव होता का? त्यांनी कोणाच्या दबावामुळे स्वत:चे गुप्तांग कापले का?, अशी कुजबुज सध्या सुरु आहे. मला भेटण्यासाठी कोणीही गडावर येऊ नये, असे आवाहनही त्यांनी भक्तांना केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुढ आणखीनच वाढले आहे.

Ahilyanagar News: तारकेश्वर गडावर नेमकं काय घडलं होतं?

तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री हे 16 मार्चला संध्याकाळी आपल्या भक्तांसोबत गडावर होते. संध्याकाळी साडेपाच वाजता भक्तांना सोडून ते आपल्या खोलीत निघून आले. यानंतर त्यांनी खोलीत स्वत:च्या अंगावर वार करुन घेतले. नंतर त्यांच्या खोलीत कोणीतरी गेल्यावर त्यांना ते जखमी अवस्थेत आढळून आले. यानंतर आदिनाथ महाराज शास्त्री यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना मानणारा मोठा भक्त परिवार अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात आणि बीड जिल्ह्यात आहे. आदिनाथ महाराज यांनी हे पाऊल उचलल्यानं त्यांच्या पाथर्डी आणि बीड जिल्ह्यातील भक्त परिवारात मोठी खळबळ उडाली होती.

Continues below advertisement

आणखी वाचा

पारनेरमध्ये वारकरी संप्रदायाला काळिमा, वासनांध कीर्तनकार महाराजाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार