नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणाव आणि वाढत्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सरकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सरकारी विमा कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांसाठी काटकसरीचे कठोर निर्देश जारी केले आहेत. अनावश्यक खर्च टाळणे, प्रवासावर नियंत्रण ठेवणे आणि शक्य तितक्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

Continues below advertisement

अर्थ विभागाने जारी केलेल्या निर्देशांनुसार, सरकारी बँका (PSBs), प्रादेशिक ग्रामीण बँका (Regional Rural Banks RRBs), सरकारी विमा कंपन्या (Public Sector Insurance Companies PSICs) आणि  सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था (Public Sector Financial Institutions PSFIs) यांनी तातडीने खर्च नियंत्रणाचे उपाय अमलात आणावेत. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे आणि कार्यालयीन कामकाजात ऊर्जा बचतीला प्राधान्य देण्यासही सांगण्यात आलं आहे.

Video Conferencing Meetings : सर्व बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे

सरकारनं स्पष्ट केलं आहे की समीक्षा बैठका, सादरीकरणे, सल्लामसलत आणि प्रशासकीय बैठकांचा जास्तीत जास्त वापर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केला जावा. प्रत्यक्ष बैठकीला केवळ अत्यावश्यक प्रकरणांमध्येच परवानगी दिली जाईल.

Continues below advertisement

Travel Expense Cut : प्रवास खर्चावर निर्बंध

देशांतर्गत आणि परदेश दौऱ्यांवरही खर्च नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परदेश दौरे अत्यावश्यक असल्यासच मंजूर केले जातील आणि शक्य तितक्या कमी खर्चात ते पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Government Expense Cut : कोणत्या संस्थांना लागू होणार नियम?

केंद्र सरकारचे हे निर्देश पुढील संस्थांना लागू असतील:

  • सरकारी बँका (PSBs)
  • प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs)
  • सरकारी विमा कंपन्या (PSICs)
  • सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था (PSFIs)

Energy Crisis Impact India : ऊर्जा संकटामुळे सरकारचा निर्णय

अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. त्याचा परिणाम भारताच्या ऊर्जा खर्चावर होत असल्याने केंद्र सरकारने विविध विभागांना काटकसरीचे उपाय तातडीने राबवण्यास सांगितले आहे.

Fuel Price Hike Impact India : भाजीपाल्यांचे दर वाढले

दरम्यान, डिझेलचा अपुरा पुरवठा आणि दरवाढ या दोन्हीचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होताना दिसतोय. यामुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंना दरवाढीचा फटका बसताना दिसत आहे. राज्यभरात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. बहुतांश भाज्यांचे दर प्रतिकिलो 80 ते 100 रुपयांच्या घरात आहेत. दूध, भाजीपाला आणि इंधनाचे दर वाढल्यानं सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आल्याचं चित्र आहे.

ही बातमी वाचा: