Agriculture News : लसणाच्या किंमतीत मोठी वाढ ( Garlic Price) होताना दिसत आहे. याचा लसूण उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फायदा होत आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) आगर माळवा भागातील शेतकरी बंदूक घेऊन लसणाचे रक्षण करत आहेत. शेतातून लसणाची चोरी होऊ नये म्हणून बंदुका, काठ्या घेऊन पिकाचे रक्षण केले जात आहे.


लसणाचा दर प्रतिकिलो 400 ते 500 रुपयांवर


शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी स्वतःचे गट तयार केले आहेत. शेतकऱ्यांनीही या संघांची तीन-चार शिफ्टमध्ये विभागणी करून आपला वेळ काढला आहे. जेणेकरुन शेतकरी एक-एक करून शेताचे संरक्षण करण्यात गुंतले आहेत.मध्य प्रदेशातील आगर माळवा भागात शेतकरी बंदूक घेऊन लसणाचे रक्षण करत आहेत. शेतातून लसणाची चोरी होऊ नये म्हणून बंदुका, काठ्या घेऊन पिकाचे रक्षण केले जात आहे. शेतकरी दिवस-रात्र एक-एक गट तयार करून जागरुकता ठेवत असल्याची परिस्थिती आहे. सध्या लसणाच्या गगनाला भिडलेल्या भावामुळं शेतकऱ्यांच्या शेतातून लसूण चोरीला जाण्याची भीती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी प्रत्येक प्रकारे आपली पिके वाचवायची आहेत. सध्या लसणाचा भाव 400 ते 500 रुपये किलोवर पोहोचला असून, त्यामुळं शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे. अशा परिस्थितीत चोरी झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.


शेतकऱ्यांचा रात्रंदिवस आपल्या शेतात पहारा


आगर माळवा जिल्ह्यातील गावांमधील शेतकरी रात्रंदिवस आपल्या शेतात पहारा देत आहेत. वास्तविक, शेतकरी नेहमीच त्यांच्या पिकांची काळजी घेतात. त्याचे संरक्षण करतात, जेणेकरून वन्य प्राणी आणि भटके प्राणी त्यांच्या पिकांचे नुकसान करू शकत नाहीत. पण यावेळी जे घडत आहे ते आश्चर्यापेक्षा कमी नाही. खरे तर शेतकरी आपले पीक जनावरांपासून नाही तर माणसांपासून आणि चोरांपासून वाचवत आहेत. आगर माळवा भागातील सुमारे पाच हजार एकर क्षेत्रात शेतकरी लसणाची लागवड करतात. अशी अनेक गावे आहेत, जिथे बहुतेक शेतकरी फक्त लसणाची लागवड करतात. येथील मोठे क्षेत्र व भाव जास्त असल्यानं इथं चोरट्यांची दहशत वाढवली आहे. त्यामुळेच आता शेतकरी सुरक्षततेत गुंतले आहेत.


अनुकूल हवामानामुळं लसणाचे पीक वसंत ऋतूत आले आहे. सध्या बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून 250 रुपये किलोने लसणाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी स्वतःचे गट तयार केले आहेत. शेतकऱ्यांनीही या संघांची तीन-चार शिफ्टमध्ये विभागणी करुन आपला वेळ काढला आहे. जेणेकरुन ते एक-एक करुन शेताचे संरक्षण करण्यात गुंतले आहेत.


महत्वाच्या बातम्या:


लसूण करतोय काजू बदामाची बरोबरी, सध्या बाजारात मिळतोय 'एवढा' दर