BJP Astrology : दिल्लीत 6 एप्रिल 1980 रोजी रात्री 11:45 वाजता भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली. त्या वेळी नवमांश कुंडलीत मिथुन राशी आणि वृषभ राशीचा उदय होत होता. यावेळी दशम स्वामी आणि तृतीय स्वामी यांचा परिवर्तन योगही (Parivartan Yoga) तयार झाला होता. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहून हरलेला खेळ जिंकण्याची हिंमत देखील हा योग देतो.


सत्तेच्या शिखरावर पोहोचवू शकतात हे ग्रह


जन्मांग आणि नवमांश हे सूर्य आणि चंद्रासारखे शासक ग्रह देखील या वेळी उच्च घरात, म्हणजेच दहाव्या घरात होते. याचाच अर्थ, हे ग्रह एखाद्याला सत्तेच्या शिखरावर पोहोचवू शकतात. या तिथीला उदय झालेला पक्ष धार्मिक असण्याची शक्यता असते आणि त्यामुळे या पक्षातील राजकारणी लोकांमध्ये प्रसिद्ध होण्याची देखील शक्यता असते. भाजप पक्षाच्या कुंडलीत अनेक राजयोग देखील आहेत, त्यामुळे ते सत्तेच्या शिखरावर पोहोचले आहेत.


सद्यस्थिती आणि सार्वत्रिक निवडणुका


भारतीय जनता पक्ष 16 फेब्रुवारीपासून चंद्राच्या महादशेत आणि बुधाच्या उपकाळात चालत आहे. सध्या या दरम्यान चंद्र नीचभंग राजयोग आणि गजकेसरी योग देखील तयार होत आहे. या राजयोगामुळे समृद्धी आणि राजकीय सत्ता मिळवण्याची शक्यता निर्माण होत आहे. नवमांश कुंडलीत चंद्र शक्तीच्या दशम घरात आणि दशमांश कुंडलीत शुक्र तिसऱ्या घरात विराजमान आहे. सत्ताप्राप्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी हे योग अतिशय शुभ आहेत. या काळात पक्षाला विशेष यश मिळू शकतं.


भाजपला 400 जागा जिंकता येणार नाही?


दुसरीकडे बुध ग्रह भाग्याच्या नवव्या घरात आणि चंद्रापासून चौथ्या घरात बसून राजयोग निर्माण करत आहे. त्यामुळे राजकीय पक्षासाठी हा काळ चांगला ठरेल. जन्मांग आणि नवमांश कुंडलीत चंद्र आणि बुध यांची परस्पर स्थिती देखील अनुकूल आहे. या ग्रहस्थितीवरून दिसून येतं की, भाजप सार्वत्रिक निवडणुकीत चांगली कामगिरी करेल, परंतु त्यांचे प्रमुख नेते जितक्या जागा जिंकण्याचा दावा करत आहेत, तितक्या जागा त्यांना जिंकता येणार नाहीत.


सार्वत्रिक निवडणुकांनंतरचं भविष्य


अंतर्दशनाथ बुध ग्रह जो केतूसोबत बसला आहे, ज्यामुळे भविष्यात केतूची अंतरदशा देखील येईल. असं म्हणतात की, केतू जिथे बसतो तिथे तो झेंडा फडकवतो, म्हणजेच प्रगती करतो. त्यामुळे आगामी काळात भाजप हा पक्ष पूर्णपणे धार्मिक भावनांच्या रंगात रंगणार आहे. इतकं की वेड्यासारखी परिस्थितीही निर्माण होऊ शकते. धार्मिक मुद्द्यांमध्ये न रंगता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं वर्तन संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करणं ही प्रमुख नेत्यांवर मोठी जबाबदारी असेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shani Dev : शनीच्या उदयामुळे 'या' 5 राशीच्या लोकांना बसणार फटका; नोकरी-व्यवसायात मिळेल अपयश, वाढणार अडचणी