Marathwada Farmer Suicide: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील राजकीय युद्ध टोकाला पोहचले आहे. राज्यातील राजकारण सद्या या दोन्ही गटाच्याभोवती फिरत आहे. मात्र एकीकडे राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच तिकडे मराठवाड्यात मात्र गेल्या 9 महिन्यात 756 शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलले आहे. धक्कादायक म्हणजे यातील 400 शेतकऱ्यांनी पावसाळ्यात म्हणजेच पीकं उगवण्याच्या हंगामात जीवन संपवलं आहे. 

सरकारकडून अनेक उपाययोजना करूनही मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या काही थांबता-थांबत नसल्याचे चित्र आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्याचे ध्येय घेऊन सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात मराठवाड्यातील 292 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे पिके हातून गेली आहे. सरकराने मदतीची घोषणा केली असली तरीही अनेक ठिकाणी मदत अजूनही पोहचलेली नाही. त्यामुळे हतबल झालेली शेतकरी आत्महत्या करत जीव संपवत आहे. विशेष म्हणजे ज्या सप्टेंबर महिन्यात राज्यकर्ते कोणाचा कोणता पक्ष या राजकारणात व्यस्त होते, त्यावेळी मराठवाड्यातील 90 शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. 

आत्महत्या आकडेवारी ( 1 जानेवारी 2022 ते 30  सप्टेंबर 2022 )

अ.क्र. महिना  शेतकरी आत्महत्या संख्या 
1 जानेवारी  59
2 फेब्रुवारी  73
3 मार्च  101
4 एप्रिल 47
5 मे   76
6 जून 108
7 जुलै 83
8 ऑगस्ट 119
9 सप्टेंबर  90
एकूण    756

103 प्रकरणे अपात्र ठरली... 

नापिकी आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या बोज्यातून मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करत आहे. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबर या गेल्या नऊ महिन्यांत 756 शेतकरी आत्महत्याची नोंद झाली आहे. यातील 561 प्रकरणे शासकीय मदतीस पात्र ठरली असून, 103 प्रकरणे अपात्र ठरली आहे. तर 92 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक196 शेतकऱ्यांना आत्महत्या झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या...

Hingoli News : सायेब, आनूदानचे पेसे लवकर द्या, मग दिवाळीले आई पोळ्या करते; शेतकऱ्याच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Nanded Rain News: नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पिकाचं नुकसान, शेतकरी हवालदिल