भारताच्या इतिहासातील ब्रिटीश सत्तेला हादरवणारी ठिणगी: रॅायल इंडियन नेव्हीचा लढा!

1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु १९४६ चा रॅायल इंडियन नेव्ही विद्रोह तुम्हाला माहितीये का?

Image Source: twitter/@advaitwad

१९४६ च्या बंडाची सुरूवात 18 फेब्रुवारी रोजी मुंबई शहरातील एचएमआयएस तलवार येथे झाली.
जे राज्यातील इतर सर्व नौदल तळांपैकी सर्वात अत्याचारित ठिकाणांपैकी एक होते.

या घटनेला भारताच्या स्वातंत्र्यासाठीचा शेवटचा लढा म्हणूनही ओळखले जाते.
तो ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्ध भारतीय खलाशांनी केलेला एक महत्त्वाचा उठाव होता.

Image Source: Wikepedia

रॅायल इंडियन नेव्हीच्या भारतीय खलाशांना दिले जाणारे निकृष्ट दर्जाचे जेवण, ब्रिटीश अधिकाऱ्यांकडून मिळणारी भेदभावपूर्ण वागणूक, अपुऱ्या प्रशिक्षण सुविधा आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठीची वाढती मागणी ही यामागील काही प्रमुख कारणे आहेत.

मुंबई् येथील एचएमआयएस तलवार पासून हा उठाव कराची ते कलकत्ता पर्यंत संपूर्ण ब्रिटिश भारतात पसरला आणि त्याला पाठिंबा मिळाला.
यामध्ये ५६ जहाजे आणि किनाऱ्यावरील १०,००० हून अधिक खलाशांचा समावेश होता.

Image Source: इंपिरीयल वॅार म्युझियमच्या संग्रहातून

या लढ्याच्या नेतृत्वाकरिता नौदल केंद्रीय स्ट्राईक समिती (NCSC) तयार करण्यात आली, ज्याचे
नौदल उठावाच्या नियोजन समितीचे मुख्यालय मरीन ड्राईव्ह मुंबई येथे होते.

सलील श्याम, बी.सी.दत्त, मदन सिंग ऋषी देव पुरी आणि एम.एस. खान हे बंडाचे नेते होते.

Image Source: Google

एचएमआयएस तलवारचा कमांडर आर्थर फ्रेडरिक किंग भारतीय खलाशांना अमानुष वागणूक देत असे त्यामुळे रेटिंग्जमध्ये संतापाची लाट उसळली.

२०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि १००० हून अधिक लोक जखमी झाले, ७ खलाशी आणि १ कमांडर मारला गेला. या बंडामुळे ४७६ खलाशांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

Image Source: Wikepedia

या उठावादरम्यान जय हिंद , ' इन्किलाब जिंदाबाद ' आणि भारत छोडो असे नारे देण्यात आले, त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा वापरण्यात आला आणि तुरुंगात असलेल्या राष्ट्रवादी नेत्यांच्या सुटकेची मागणी केली गेली.

Image Source: Google

राजकीय पाठिंब्याचा आणि नेतृत्वाचा अभाव असल्याने आरआयएन बंडाचे उद्दिष्ट साध्य करण्यात अपयश आले.

Image Source: Wikepedia

नौदल केंद्रीय स्ट्राईक कमिटीचे अध्यक्ष एम.एस.खान आणि काँग्रेसचे सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात झालेल्या बैठकीनंतर बंड अधिकृतपणे थांबवण्यात आले.

Image Source: Google