आयुष्यात मैत्रीचे नाते आपण स्वतः निर्माण करतो. असं म्हणतात की आयुष्यात फक्त एकच खरा मित्र मिळाला तर, आयुष्य अधिक चांगलं होतं.



मात्र चुकीच्या माणसांची संगत मिळाली तर आयुष्य उद्ध्वस्त होते, कारण हजारो खोट्या आणि स्वार्थी मित्रांच्या तुलनेत एकच खरा मित्र पुरेसा असतो.



आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात, ज्यांना आपण मित्र म्हणतो, पण खरा मित्र तोच असतो जो कठीण प्रसंगी आपल्या पाठीशी उभा राहतो, म्हणून मित्र निवडताना खूप काळजी घेतली पाहिजे.



आचार्य चाणक्य म्हणतात की, जे दिखावा करतात, स्वार्थासाठी तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतात, त्यांच्यापासून दूर राहणे चांगले.



चाणक्यांनी म्हटले आहे की, संकटात अश्रू आले तर ते स्वतः पुसणे चांगले, इतर ते पुसायला आले तर ते तुमच्याशी व्यवहार करतील.



चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, जे लोक गोड बोलतात ते लबाड असतात, तसेच जो एखाद्याला त्याच्या चुका सांगतो त्यांना खरे मित्र म्हणतात.



मित्र बनवण्याआधी त्याच्या वागण्यावर, चारित्र्यावर आणि विचारांकडे नक्कीच लक्ष द्या.



चाणक्य म्हणतात की, माणसाच्या जन्मापासून येणारे गुण बदलता येत नाहीत, कारण कडुनिंबाच्या झाडावर दुधाचा अभिषेक केला तरी ते कडूच राहते



आचार्य चाणक्य म्हणतात, वाईट लोकांची विचारसरणी आणि संगती आपल्याला त्यांच्यासारखे बनवते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.