दुस-यांना मदत करणे याला माणुसकी म्हणतात, माणुसकी तीच असते, जी वाईट प्रसंगी शत्रूला पाणी देण्यास कधीच नकार देत नाही



आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीने कोणताही निर्णय हा वेळ, परिस्थिती, धर्म लक्षात घेऊनच घ्यावा.



चाणक्य सांगतात की, संकटात अशा लोकांची मदत कधीच मागू नका, ज्यांना शत्रूपेक्षा जास्त धोकादायक मानले जाते.



चाणक्यांच्या मते, त्यांनी अशा काही लोकांचा उल्लेख केला गेला आहे. जे चांगुलपणाचा मुखवटा धारण करतात.



चाणक्य म्हणतात की, जो माणूस फक्त स्वतःच्या हिताचा विचार करतो, जो नेहमी स्वत:चा फायदा कसा होईल याचा विचार करतो, त्याची मदत घेऊ नये



ज्या व्यक्तीच्या मनात ईर्ष्याची भावना असते, ती माणसे स्वतःची प्रगती करत नाही, ते इतरांनाही प्रगती करू देत नाही.



आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की, लोकांना मदत करण्यापूर्वी शंभर वेळा विचार केला पाहिजे. कारण त्यांना मदत करणे देखील धोक्यापासून कमी नाही



चाणक्याच्या मते, जो व्यक्ती धर्मापासून दूर जातो, तो पापी कृत्ये करू लागतो आणि इतरांनाही चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडतो.



चाणक्य म्हणतात की, अशा लोकांच्या संपर्कात राहून त्यांना मदत केल्याने अपमानित व्हावे लागते.



काही लोकं एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे वार करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. असे लोक यशात अडथळे निर्माण करतात, त्यांच्यापासून अंतर ठेवणे चांगले.