उस्मानाबाद : महावीतरण कंपनीला तब्बल 30 हजार 842 कोटींचा विक्रमी तोटा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jul 2018 01:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महावितरण कंपनी पूर्णपणे डब्यात गेली का असा प्रश्न पडलाय कारण गेल्या दीड वर्षात महावीतरण कंपनीला तब्बल 30 हजार 842 कोटींचा विक्रमी तोटा झाला आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली जाण्याची शक्यता आहे. कारण महावितरणनं घरगुती वापरासाठी 5 टक्के तर कृषी आणि इतर वापरासाठी 35 टक्के ऐवढ्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा भुर्दंड सहन करावा लागू शकतो.