Mumbai Asha Bhosle Funeral : आशाताईंचं निधन, कुटुंबीयांना अश्रू अनावर, सचिन तेंडुलकरही हळहळला..
Mumbai Asha Bhosle Funeral : आशाताईंचं निधन, कुटुंबीयांना अश्रू अनावर, सचिन तेंडुलकरही हळहळला..
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
म्हणजे खरं सांगायचं तर कोणाचा विश्वास बसणार नाही पण लता दीदी असतील किंवा मीनाताई असतील त्यांनी एके ठिकाणी असं म्हटलंय की आशा कधी संगीताकडे वळेल गाण्याकडे वळेल असं मला वाटलं नव्हतं घरात ती बाबांसमोर गायची ती गाणं शिकायची पण ती कधी पार्श्वगायनाकडे वळेल असं वाटलं नव्हतं पण त्यानंतरच्या काळात आलेल्या प्रापंचिक जबाबदार्या संसाराचा गाडा हे सगळं ओढण्यासाठी त्यांनी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं म्हणजे त्याही सांगतात की पोट भरण्यासाठी पहिल्यांदा मी या क्षेत्राकडे आले आणि त्यानंतर मग ते क्षेत्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालं पण केवळ जबाबदारी स्वीकारण्यासाठी किंवा जबाबदार्या आहेत म्हणून एखादं क्षेत्र निवडणं आणि मग कायावाचा मने त्या क्षेत्राला समर्पित होणं म्हणजे काय तर आशाताई याचं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल हे भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले एवढे मी भोगले की मज हसावे लागले या सुद्धा सुरेश भटांच्या ओळी आहेत आणि त्या सुद्धा आशाताईंसाठीच अगदी तंतोतंत लागू होतात एवढं दुःख एवढे चढ उतार एवढा त्रास त्यांनी आयुष्यात भोगला पण तरीसुद्धा आपल्या गाण्यातून आपल्या स्वरांमध्ये आपल्या सादरीकरणातून चाहत्यांना फक्त आणि फक्त निखळ आनंद त्यांनी दिला आणि संगीताची सेवा त्यांनी केली आणि त्यांचा विचार सुद्धा हाच होता की प्रत्येकाला स्वतःच्या विवंचना आहेत प्रत्येकाला स्वतःचे त्रास आहेत मग आपण काय करू शकतो तर आपल्यासमोर आलेल्या प्रेक्षकांना घडीभरचा चार घडीचा आनंद देऊ शकतो तो आपण देऊया हा विचार करून त्या सातत्यानं स्वतःचं दुःख बाजूला ठेवून हसत मुखानं सगळ्यांना सामोऱ्या जात राहिल्या प्रेमानं म्हणजे त्यांच्या आयुष्यात जी कटुता होती ती कटुता कधीच त्यांच्या वागण्या बोलण्यात व्यवहारात कधीच पाहायला मिळाली नाही किंवा त्याची झलकही कुठे दिसली नाही एवढं ते पारदर्शी आणि आरसपानी व्यक्तिमत्व होतं खरं आहे आणि आता पुन्हा एकदा मला त्या कालच्या कार्यक्रमाची आठवण होती या निमित्ताने सुधीर गाडगळे ज्यांच्या सोबत म्हणजे सुधीर सुधीर गाडगळे यांनी खूप मुलाखती केल्या त्यांच्यासोबत तेही तू आता जे बोललीस तेच त्यांनी सांगितलं होतं काल हं की आशाताईंचं पण नेहमी हेच होतं म्हणजे दुःखाचे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये आले चढ उतार आले पण जेव्हा त्या मंचावर यायच्या तेव्हा त्या म्हणायच्या की कशाला समोरच्या प्रेक्षकाला किंवा आपल्या चाहत्यांना ते दाखवायचं कारण तो इतका आपल्यासाठी मनापासून येत असतो तर आपण त्याला भरभरून आनंद द्यायचा आणि त्याच्यामुळे एक उत्फुल्ल व्यक्तिमत्व एक ऊर्जादायी व्यक्तिमत्व ज्याला म्हणता येईल मंचावर येत्या भारून टाकायच्या वातावरण म्हणजे सुधीर गाडगळे यांनी तेच सांगितलं की एखादा किस्सा रंगवून सांगण्याची किंवा समोरच्या प्रेक्षकाच्या आवडीननुसार तो कसा आहे ते पाहून तो किस्सा तिकडे मांडण्याची जी शैली होती त्यांची म्हणजे त्या गायीका म्हणून ग्रेट किती होत्या हे सगळ्यांना माहिती आहे ते वेगळं सांगायला नको पण त्या मुलाखतींचे कार्यक्रम रंगवणं हे जसं दोन्ही बाजूनी ते होणं गरजेचं असतं मुलाखत घेणारा पण आणि देणारा देणारा पण तर त्यावेळी आशाताई ज्या पद्धतीने किस्से खुलवून सांगायच्या किंवा मध्येच सुधीर गाडगळे यांनी तसं तेच सांगितलं की त्या मिश्कील पण खूप होत्या तर त्या तसाच मध्येच खटाळपणा करून जायच्या मध्येच एखादी चेष्टा मस्करी करून जायच्या ते वातावरण जेणेकरून हलकाफुलका राहील वातावरणामध्ये एक आनंद सकारात्मकता राहील म्हणजे गाण्यातूनच नाही तर आपल्या व्यक्तिमत्वातून आपण मंचावर येण्याने जसं आपण म्हणतो ना काही वेळा काही व्यक्ती आल्या समोर की एक पॉझिटिव्ह एक सकारात्मक ऊर्जेचं एक ती व्यक्ती पूर्णपणे भांडार घेऊन समोर येत असते तर तशा आशाताई होत्या की एक मंच त्या भारून टाकायच्या आणि ती आठवण पदोपदी अनेकांना माझी खात्री आहे की फक्त मुलाखत घेणाऱ्यालाच नाही तर समोर बसणाऱ्यालाही आज ज्यांचे ज्यांनी असंख्य मुलाखती आपण पाहिलेल्या आहेत किंवा प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत ज्यांनी त्यांनाही ती माझी खात्री आहे ती त्यांना येत असणार आठवण खरं आहे मग आपल्या कामाबद्दल किंवा आपल्या कर्तृत्वाबद्दल कॉन्फिडन्स असणं म्हणजे काय तर एकदा राज ठाकरेनी विचारलं होतं की तुम्ही आणि लता दीदींनी नेमकं काय केलं तर क्षणाचाही विलंब न होता त्या म्हणाल्या होत्या की आम्ही राज्य केलं म्हणजे यात किती आत्मविश्वास आहे की हो आम्ही हे केलंय आम्ही स्वतःला सिद्ध केलंय आणि त्याच्यासाठी आम्ही स्वतः खूप जास्त स्वतःला पैलू पाडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही राज्य केलं म्हणजे अनेकदा लता श्रेष्ठ की आशा श्रेष्ठ यासुद्धा चर्चा उघडपणे झाल्या कधी कानागोष्टी झाल्या पण त्या दोघींमधलं नातं इतकं सुंदर होतं म्हणजे लहानपणीची एक आठवण दीदींनी सांगितलीय की दीदी शाळेत जायला लागल्या होत्या पहिल्या दिवशी त्या शाळेत गेल्या पाटीवरती श्री गणेशाय नमः त्यांनी लिहिलं आणि त्यानंतर गुरुजी खुश झाले गुरुजी म्हणाले आज माझ्याकडून तुला 10 मार्क दीदी खुश होऊन घरी गेल्या दुसऱ्या दिवशी कडेवर घेऊन आशाताईंना घेऊन त्या शाळेत गेल्या आणि गुरुजी चिडले ते म्हणाले की एवढी लहान आहे मी हिला शाळेत बसवू शकत नाही मी हिला घेऊ शकत नाही दीदी तडक तिकडून तशाच बाहेर पडल्या घरी गेल्या आणि आईला सांगितलं की उद्यापासून मी शाळेत जाणार नाही कारण का आशाला ते शाळेत बसू देत नाहीयेत इतकं त्या दोघींमधलं जिव्हाळ्याचे संबंध होते इतकं तर इतकं ते गहिरं नातं होतं आणि परस्परांसाठीचं ते प्रेम आस्था काळजी ही सातत्यानं दिसत होती आणि आशाताईंनी सुद्धा अनेकदा मान्य केलं की आम्ही दोघींनी दोन टोकं धरून ठेवली लता दीदी या धीरगंभीर शांत आणि मधाळ आवाजाच्या होत्या माझा आवाज अवखळ होता आणि आम्ही दोघींनी ते दोन टोकं धरून ठेवली आमच्यामध्ये हे कॉम्पिटिशन होती त्यांनी कधीच नाकारलं नाही.