Sachin Kharat on Raj Thackeray : 'राज ठाकरे यांचे भाषण जातीयतेला, धर्मांधतेला खतपाणी घालणारे'
"माननीय राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना संबोधीत करताना भाषण केलं या भाषणामध्ये रयतेचे राजे शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) तुलना सावरकरांची (Savarkar) केली अत्यंत चुकीचे आहे, भारतावर मुघलांनी, इंग्रजांनी आक्रमण केले याचा उल्लेख केला परंतु आर्य लोकांनी आक्रमण केले याचा उल्लेख केला नाही तसेच त्यांनी परप्रांतीयांना मारताना त्यांनी आईची शिवी दिली म्हणून त्यांना मारले असा त्यांनी उल्लेख केला, तसेच ते बोलताना म्हणाले जातीचे राजकारण जे चाललेलं आहे ते अत्यंत घाणेरडं आहे मग खरंच जातीचे राजकारण घाणेरडं वाटत असेल तर माननीय राज ठाकरे यांनी जाणवं घालून प्रदर्शन केलं होतं हे त्यांना ध्यानात आहे का ? त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेले भाषण हे जातीयतेला, प्रांतभेदाला आणि धर्मांधतेला खतपाणी घालणारे आहे" , असं आरपीआय नेते सचिन खरात म्हणाले.