Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Omraje Nimbalkar : राज्यातील अतिवृष्टीच्या मदतीबाबत (farmers loan waiver) राज्य सरकारची मोठी अनास्था असल्याचे प्रकरण समोर आलं आहे. राज सरकारने मदतीसाठी केंद्राला प्रस्तावच पाठवला नसल्याची माहिती पुढे आली आहे. केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच काल (मंगळवार 2 डिसेंबर) संसदेत लेखी उत्तरात हि माहिती दिली आहे. सोबतच अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यातही सरकारची गंभीर चूक असल्याचे दिसून आलंय. 14 लाख हेक्टरवर नुकसान झालं असताना केंद्राला मात्र 1.10 लाख हेक्टरचाच आकडा देण्यात आलाय. राज्याच्या प्रस्तावाशिवाय केंद्रानं 3 हजार 132.80 कोटी दिले असल्याचीही माहिती आहे. दरम्यान या मुद्द्यवरून आता विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
Omraje Nimbalkar : मी देखील प्रचारात व्यस्त होतो. मात्र पंचातारीक प्रश्न विचारायला विसरलो नाही
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मिळावी, यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्तावच पाठवला नाही. लोकसभेतील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या तारांकित प्रश्नाला केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच लेखी उत्तर दिलंय. राज्यभरात अतिवृष्टीमुळे 75.42 लाख हेक्टर वरील पिकाचे नुकसान, तर 3598 घरांचा नुकसान झालं आहे. महापुराच्या विळख्यात 224 लोकांचा मृत्यू, तर 599 जनावर मृत्युमुखी पडल्याची लेखी उत्तरात माहिती आहे. दरम्यान याबाबत खासदार ओमराजे निंबाळकर माहिती देताना सांगितलं कि, केंद्रीय सरकारनेच स्पष्टपणे या बाबत माहिती दिली आहे. राज्य सरकारने प्रस्तववेळेत दिला असता तर तात्काळ मदत मिळण्यास मोठी मदत झाली असती. मी देखील प्रचारात व्यस्त होतो. मात्र मी माझा पंचातारीक प्रश्न विचारायला विसरलो नाही. त्यामुळे बाकी मंत्र्यानी प्रचारातून वेळ काढून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर