Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
पहिलं तर म्हणजे माझे गेल्या 40 वर्षापासून असलेले सहकारी या भोसरी मतदारसंघाचे माजी आमदार माजी महापौर आणि आधी अनेक पदावर ज्यांनी काम केलं या कुटुंबाशी माझा फक्त राजकीय संबंध नाही तर कौटुंबिक संबंध आहे आणि म्हणून आज विलासराव लांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांचं सकाळीच ठरलं होतं की मी आज येणार आहे मी त्यांना सांगितलं होतं त्याप्रमाणे मी आलेलो आहे. आता प्रश्न असा आहे की विधानपरिषदेची निवडणूक लागलेली आहे अनेक उमेदवार इच्छुक होते असतात त्याप्रमाणे विलासराव देखील इच्छुक होते आणि ज्या वेळेला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडे विलासरावांच्या सहित आणखीन बऱ्याच लोकांनी मग भाऊसाहेब बोर असतील भोईर असतील किंवा योगेश बहल असतील नाना काटे असतील आणि पुणे शहरातले काही लोक सुनील टिगरे वगैरे सगळे अ मानकर असतील टिगरे असतील त्यांनी सगळ्यांनी अ मग बालवडकर होते हे सगळे इच्छुक होते परंतु पक्षाच्या श्रेष्ठींनी आता हा निर्णय घेतलेला आहे आणि साधारणतः कार्यकर्ता हा पक्षासाठी काम करत असतो नेत्यासाठी काम करत असतो विलासरावांचं योगदान आदरणीय पवार साहेबांच्या पासून अजित दादांच्या पासून एक मोठं योगदान हे पक्षासाठी राहिलेलं आहे. आणि त्यांनाही मग विधानसभेची उमेदवारी असेल महापौर पद असेल बाकीची पद असतील एकदा त्यांना लोकसभा तिकीट आपण दिलेलं होतं परंतु काही वेळेला त्यांना यश मिळालं काही वेळेला नाही मिळालं पण कुठल्याही अशा प्रकारच्या गोष्टींनी खचून न जाता एक सर्वसामान्यांमध्ये जाऊन सर्वसामान्य माणसासाठी लढणार काम करणारा कार्यकर्ता म्हणून विलासराव यांची ओळख आहे. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा ज्यावेळेला ही संधी चालून आली होती त्यावेळेला ते आपल्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून इच्छुक होते. पण असं असतं की पक्षामध्ये ज्यावेळेला पक्ष नेतृत्वाकडून काही निर्णय घेतला जातो त्यावेळेला मग निर्णय होईपर्यंत सगळ्याच कार्यकर्त्यांना अधिकार असतो उमेदवारी मागायचा पण निर्णय झाल्यानंतर मात्र मग सगळ्याच कार्यकर्त्यांनी म्हणजे त्यांना तो अनुकूल निर्णय असेल नसेल तर सगळ्याच कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये एक सामंजस्याची भूमिका घ्यावी लागते. आणि म्हणूनच विलासराव हे आज जरी त्यांना उमेदवारी दिलेली नसली तरी त्यांनी काही वेगळं काही पाऊल उचललेलं नाही. आणि ते शांत राहिलेले आहेत. निश्चित पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आम्ही या सगळ्या त्यांच्या भावना कानावर घालू आणि भविष्यकाळामध्ये विलासराव लांडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या शक्तीचा वापर करण्यासाठी काय करायचं याच्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. पण साहेब एक इथेच नाही तर पुण्यातही मोठ्या प्रमाणात खदखद व्यक्त होते एवढ्या सगळ्या दिग्गज नेत्यांमध्ये एकही तुल्यबळ वाटू नये आणि ऐन वेळेला ह्या रावांना संधी द्यावी ही ती खदखद आहे. मी आपल्याला काय सांगितलं की जोपर्यंत पक्षाचा निर्णय होत नाही तोपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना अपेक्षा असतात. आता ज्यावेळेला पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व या बाबतचा निर्णय घेतो त्यावेळेला त्याचे काही कारण मीमांसा काय आज लगेच करता येणार नाही. अजून चित्रही स्पष्ट झालेलं नाही मुळातच हे महायुतीची ज्या अ याच्यामधून ज्या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या त्याच्यामध्ये रायगडची एक जागा आणि पुण्याची एक जागा मिळालेली आहे. आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी ताकद राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणि भाजपची ताकद पाहिलं हं तर ही जवळजवळ बरोबरीची ताकद या ठिकाणी आहे. शिंदे सेनेची पण ताकद त्याच्यामध्ये आहे. हं आणि त्यामुळे उमेदवार निश्चित निवडून येईल याच्याबद्दल काही शंका कुणाला असायचं काही कारण नाही. चांगल्या मताने निवडून येईल. तर कार्यकर्त्यांच्यामध्ये जी नाराजी आहे किंवा तुमच्या शब्दांत खदखद आहे हं तर सर्व कार्यकर्ते त्यांच्याशी सर्व नेत्यांशी जिल्ह्यातल्या बसून आम्ही एकत्रितपणे विचार करून त्याच्यातून कसा मार्ग काढायचा हे आम्ही ठरवू. अगदी शेवटचा प्रश्न खरं तर या सगळ्या परिस्थितीतही दिलीप मोहिते बंडखोरीच्या तयारीत आहेत