NCP News Vastap Episode : संपवण्याचा नाही तर एकमेकांना टीकवण्याचा प्रयत्न, पवारांमध्ये पडद्यामागे काय घडतय?
NCP News Vastap Episode : संपवण्याचा नाही तर एकमेकांना टीकवण्याचा प्रयत्न, पवारांमध्ये पडद्यामागे काय घडतय?
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
राजकीय भूमिकेबद्दल संदिग्धता निर्माण करणं आणि ती संदिग्धता पुढे कायम राहील याची काळजी घेणं हा पवारांच्या राजकारणाचा आतापर्यंतचा स्थायीभाव राहिला आहे. पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही बाजूंच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ही संदिग्धता आणखी कशी वाढीस लागेल याचीच काळजी घेण्यात आली आहे आणि त्यातून आपलं राजकारण दोन्ही बाजूंनी पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे. या दोन्ही बाजू एकमेकांना राजकारणातून संपवण्याचा नाही तर दुसरी बाजू देखील राजकारणात कशी टिकून राहील आणि त्या निमित्ताने पवार ब्रँड कसा राजकारणामध्ये कायम राहील याचीच काळजी घेताना दिसतायत या व्हिडिओच्या माध्यमातून या पवारांच्या राजकारणाचा वेद घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत अर्थात हा प्रयत्नच असेल तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार याची चर्चा सुरू झाली आणि त्याला निमित्त ठरलं ते 8 मेला शरद पवारांनी पुण्यात इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीच या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी असं वक्तव्य केलं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांमध्ये विलीन होतील का? याचा निर्णय आता आपण नाही तर सुप्रिया सुळे घेतील. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेनी वेग घेत. घेतला, मात्र त्याआधी या चर्चेसाठीची पार्श्वभूमी दोन्ही बाजूंनी तयार करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकल झाल्यानंतर सुरुवातीच एक वर्ष अजित पवारांनी शरद पवारांसोबत कोणत्याही कार्यक्रमाला, बैठकीला एकत्र येणं टाळलं, मात्र त्यानंतर एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळाला, तो म्हणजे पुण्यातील वसंत दादा शुगर इंस्टिट्यूटच्या बैठकांच्या निमित्ताने हे काकापुतने वारंवार. बैठकांसाठी एकत्र येत होते, मुंबईत देखील एका बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले आणि त्यातून या चर्चेनी मोठा वेग घेतला. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अर्थातच सर्वांच्या नजरा होत्या त्या सुप्रिया सोयनकडे कारण शरद पवारांनी जबाबदारी त्यांच्यावरती सोपवलेली होती. मात्र सुप्रिया सुळे यांना जेव्हा याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी काय म्हटलय? तर त्यांनी असं म्हटलं आहे की आमच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दोन्ही. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पुढे त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नाहीत का? त्यावरती त्यांच उत्तर आहे की यासाठी कोणतीही टाईमलाईन ठरवून देण्यात आलेली नाही. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्र येतील का? तर याबद्दलचा निर्णय कधी घ्यायचा हे अजूनही. नाही असं सुप्रिया सोळे सांगतायत आणि त्यामुळे ही संदिग्धता हा संभ्रम आणखी वाढतोय हा संभ्रम शरद पवारांनी जसा नेहमी त्यांच्या विरोधकांसाठी निर्माण केला तसाच तो त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या सहकार्यांसाठी देखील निर्माण केला आणि त्यातून धक्का तंत्राचा वापर करत आपलं राजकारण पुढे सुरू ठेवलं 55-60 वर्षांमध्ये देखील शरद पवारांच राजकारण. संदर्भहीण का झालं नाही, शरद पवार राजकारणामध्ये का टिकून राहिले? या प्रश्नाच उत्तर या त्यांच्या लवचिकतेमध्ये दडलेला आहे. शरद पवारांसोबत आठ खासदार आहेत, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला या खासदारांची गरज आहे आणि या खासदारांना देखील त्यांच्या मतदारसंघातली काम व्हावीत यासाठी सत्तेमध्ये जाण्याची आस लागली असं बोलल जातय. आमदारांची संख्या 10 आहे या. बऱ्यापैकी आमदार देखील सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी आसुचलेले आहेत असही बोलल जात आहे. मग जर सोबत असलेल्या या खासदार आणि आमदारांचा रेटा असेल तर त्यांना थेट अजित पवारांच्या पक्षामध्ये जाण्यापासून थांबवण्यासाठी म्हणून देखील शरद पवारांनी खेळलेली ही खेळी असू शकते की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र घेऊ येऊ शकतात. खरं तर शरद पवारांनी 2014 पासून. यांच्या सहकार्यांना आपण भारतीय जनता पक्षासोबत जाऊ शकतो असं आश्वासन देऊन वेळोवेळी चर्चेच्या फेऱ्या घडून आणल्या अनेक नेत्यांनी अजित पवारांपासून चगन गुजबड. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी वेळोवेळी हे वारंवार सांगितलं की शरद पवार हे नेहमी सांगायचे की आपण भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासाठी चर्चा करतो आहोत, आपण त्यासाठी बोलणी करतो आहोत, मात्र प्रत्यक्षात शरद पवार भारतीय जनता पक्षासोबत कधीच गेले नाहीत. ही चर्चा घडून त्यांनी आपल्या सहकार्यांना सोबत ठेवण्यात यश मिळवलं, मात्र एक वेळ अशी आली. शरद पवार त्यांच्या सोबत जातील का आणि अजित पवारांसोबत जाणं याचा अर्थ भारतीय जनता पक्षासोबत जाणार जे शरद पवारांनी आजपर्यंत टाळलेल आहे ते या टप्प्यावरती भारतीय जनता पक्षासोबत जातील का? तर शरद पवारांचा आत्तापर्यंतचा राजकीय इतिहास कितीही संभ्रमाचा, संदिग्धतेचा जरी असला तरी एक गोष्ट मात्र सर्वच जण मान्य करतील. ते स्वतः ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या पक्षामध्ये त्यांना आहे का? हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत असलेली जवळी आणि दिल्लीचे राजकारण जे आजपर्यंत अजित पवारांनी केलेल नाही त्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पुढे येण आणि त्यातून अजित पवारांची भूमिका वेगळी आहे का आणि सुनील तटकरे आणि यांची भूमिका वेगळी आहे का? हा प्रश्न विचारला जातोय. सुनील तटकरे यांनी याच उत्तर दिलंय की या अफवा आहेत मात्र राजकारणामध्ये या त्यांच्या वक्तव्याला अर्थातच सगळ्या अंगानी तपासून घेतलं जाईल. तर राष्ट्रवादीचे हे दोन्ही गट राजकारणात एकमेकांना टिकवण्याचा प्रयत्न करतायत कारण पवार ब्रँड टिकला पाहिजे आणि वेळ आली तर दोघांनीही एकमेकांसोबत येण्याचे दरवाजे खुले असले पाहिजेत. आपण शिवसेनेच्या बाबतीमध्ये नेमकी उलट परिस्थिती पाहतो आहोत. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतल्यानंतर त्यांचं पक्ष चिन्ह आणि नाव हे सगळच काढून घेतल्यानंतर शिवसेनेच्या या दोन्ही शाखा एकमेकांना संपवण्याची भाषा करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र तसं झालेलं नाही. आपण. दुसऱ्या बाजूला जर टिकून ठेवलं तरच राजकारणामध्ये आपलं महत्व उरतं हे दोन्ही बाजूंना खास करून अजित पवारांना नेमक ठावत आहे त्यामुळे हा पवार ब्रँड टिकावा यासाठी म्हणून दोन्ही बाजू प्रयत्न करत आहेत आणि त्यातूनच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा घडून आणली गेली आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने जी भाषण आपण पाहिली. त्या भाषणांमध्ये देखील एकमेकांवरती विखारी टीका करण्याच टाळण्यात आलय.