Mumbai Water : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात दमदार पाऊस, 361 पाणीपुरवठा होईल एवढा साठा
abp majha web team
Updated at:
11 Sep 2023 08:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत आठ दिवसांत तब्बल २१ दिवसांचा जलसाठा जमा झाल्याय. त्यामुळे मुंबईला पुढील ३६१ दिवस पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झालाय.
ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढली होती. मात्र, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला आणि पुढील सप्टेंबरपर्यंत पाण्याची चिंता मिटलीय. आता मुंबईच्या तलावांत 96.20 टक्के जलसाठा आहे. त्यामुळे तुर्तास मुंबईकरांवरील पाणीकपात टळल्याचं बोललं जातंय.