एक्स्प्लोर
Farmer Distress: 'आम्ही काय करायचे? मरावं का?', अज्ञाताने द्राक्ष बाग उध्वस्त केल्याने महिला शेतकऱ्याचा टाहो
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एका महिला शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेवर अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारून मोठे नुकसान केले आहे. अनिता किरण बर्डे असे या शेतकरी महिलेचे नाव असून, या घटनेमुळे त्यांचे १० ते ११ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 'आम्ही कर्जाचा डोंगर करून कशीतरी बाग उभी केली होती, आता आम्ही काय करायचे?' असा सवाल करत या शेतकरी महिलेने टाहो फोडला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये बर्डे कुटुंब हतबल झालेले दिसत आहे. दुसरीकडे, अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे तीन लाख हेक्टरवरील सोयाबीन आणि कापूस पिके धोक्यात आली आहेत, ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
पुणे
Advertisement
Advertisement

















