एक्स्प्लोर
Thackeray Talks: 'मनं जुळली तर एकत्र घडी येऊ शकते', MNS नेते बाळा नांदगावकरांचं युतीवर मोठं विधान
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात 'मातोश्री'वर झालेल्या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी यावर एक सूचक विधान केले आहे. नांदगावकर म्हणाले, 'एकदा विश्वास निर्माण झाल्याने मन जुळले तर एकत्र घडी येऊ शकते'. ठाकरे कुटुंबातील या वाढत्या जवळीकीमुळे महाराष्ट्रातील मराठी माणसाला आनंद होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तर दुसरीकडे, शिवसेना नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी या भेटींकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघायला हवे, असे म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधू अनेकदा भेटले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















