Shivbhojan Crisis: 'आम्हीच कर्जबाजारी झालोय, दिवाळी अंधारात गेली', Shivbhojan चालकांचा आक्रोश
Continues below advertisement
राज्यातील शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) केंद्र चालकांवर आठ महिन्यांपासून अनुदान थकल्याने उपासमारीची वेळ आली आहे. 'आम्हीही शिवभोजन थाळीसाठी आलेल्या लोकांना वेठीस ठेवल्यास सरकार आमचे पैसे देईल का?', असा संतप्त सवाल शिवभोजन थाळी चालकांनी केला आहे. शासनाकडे सुमारे २०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याने गोरगरिबांना १० रुपयांत जेवण देणारी ही योजनाच संकटात सापडली आहे. कर्ज काढून केंद्र चालवावे लागत असल्याने आणि कर्मचाऱ्यांचे पगारही देता येत नसल्याने चालक हवालदिल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) अनेक केंद्रचालकांनी सांगितले की, दिवाळीसारखा सण अंधारात गेला असून, सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू केलेल्या योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारने ही थकबाकी तातडीने न दिल्यास अनेक केंद्र बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement