एक्स्प्लोर
Shivbhojan Crisis: 'आम्हीच कर्जबाजारी झालोय, दिवाळी अंधारात गेली', Shivbhojan चालकांचा आक्रोश
राज्यातील शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) केंद्र चालकांवर आठ महिन्यांपासून अनुदान थकल्याने उपासमारीची वेळ आली आहे. 'आम्हीही शिवभोजन थाळीसाठी आलेल्या लोकांना वेठीस ठेवल्यास सरकार आमचे पैसे देईल का?', असा संतप्त सवाल शिवभोजन थाळी चालकांनी केला आहे. शासनाकडे सुमारे २०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याने गोरगरिबांना १० रुपयांत जेवण देणारी ही योजनाच संकटात सापडली आहे. कर्ज काढून केंद्र चालवावे लागत असल्याने आणि कर्मचाऱ्यांचे पगारही देता येत नसल्याने चालक हवालदिल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) अनेक केंद्रचालकांनी सांगितले की, दिवाळीसारखा सण अंधारात गेला असून, सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू केलेल्या योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारने ही थकबाकी तातडीने न दिल्यास अनेक केंद्र बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र
Prakash Mahajan : ज्यांच्यासाठी लढले, विरोधकांना भिडले, त्या Raj Thackeray यांच्यावर घणाघाती टीका
Maharashtra Cabinet Shiv Sena vs BJP : राज्य मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांची गैरहजेरी
Andheri CNG Crisis : मरोळमध्ये सीएनजीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा
Ladki Bahin Yojana EKYC : लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ
Bachchu Kadu on EVM : ईव्हीएमचा घोळ झाला नाही तर आम्ही नक्की जिंकू : बच्चू कडू
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion






















