Satyacha Morcha : मविआ-मनसेच्या सत्याच्या मोर्चाचा मार्ग कसा असेल?

Continues below advertisement
मुंबईत आज विरोधी पक्षांनी एकत्र येत 'सत्याचा मोर्चा' काढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही नेते या मोर्चाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येणार आहेत. 'एका दरोडेखोराने गावावर दरोडा घातलाय आणि अख्खा गाव त्या दरोडेखोराला पकडायला एकत्र आलाय,' अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोर्चाचे वर्णन केले आहे. मतदार याद्यांमधील घोळ, बोगस मतदार आणि मतचोरीच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे. फॅशन स्ट्रीटवरून सुरू झालेला हा मोर्चा मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर धडकणार असून, तिथे नेत्यांची भाषणे होणार आहेत. काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि डाव्या पक्षांचे नेतेही या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चाद्वारे मतदार याद्या दुरुस्त होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola