एक्स्प्लोर
Nashik Satyacha Morcha: सत्याच्या मोर्चासाठी नाशिकचे मनसैनिक रवाना
मुंबईत (Mumbai) आज विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) 'सत्याचा मोर्चा' (Satyacha Morcha) आयोजित केला आहे, ज्यामध्ये शिवसेना (UBT), मनसे (MNS), काँग्रेस (Congress) आणि डावे पक्ष एकत्र आले आहेत. ‘निवडणूक आयोगाच्या हुकुमशाहीमुळे आणि BJP सोबत संगनमत करून गैरकारभार सुरू आहे’, असा गंभीर आरोप करत विरोधकांनी हे आंदोलन पुकारले आहे. मतदार याद्यांमधील घोळ आणि बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून हे पक्ष आक्रमक झाले असून, राज्यभरातून हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. नाशिकमधूनही मनसे, ठाकरे गट आणि डाव्या पक्षांचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले असून, घोटी टोलनाक्यावर त्यांची गर्दी दिसून आली. दुसरीकडे, सत्ताधारी भाजपने हा मोर्चा म्हणजे निव्वळ 'नौटंकी' आणि खोटा भ्रम पसरवण्याचा प्रकार असल्याची टीका केली आहे. या आंदोलनातून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना आपली एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















