Satara Doctor case : सातारा महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणावर राहुल गांधींचा गंभीर आरोप
Continues below advertisement
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. 'ही केवळ आत्महत्या नाहीये तर हत्या आहे,' असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी X पोस्टद्वारे केला आहे. बलात्कार आणि छळाला कंटाळून एका डॉक्टर मुलीवर आत्महत्या करण्याची वेळ येणं हे सुसंस्कृत समाजाला हादरवणारं आहे, असंही ते म्हणाले. भाजपशी संबंधित व्यक्तींनी तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. राहुल गांधी माहिती न घेता बोलतात आणि अशा संवेदनशील घटनांवर राजकारण करतात, हे दुर्दैवी आहे, असे फडणवीस म्हणाले. पीडित डॉक्टरने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे प्रकरण स्पष्ट झाले असून कुणालाही सोडले जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement