Reservation Protests | मराठा आंदोलनानंतर आता बंजारा समाजाचा मुंबईमध्ये एल्गार
Continues below advertisement
गणेश उत्सवाच्या काळात मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन झाले. या आंदोलनासाठी हजारो मराठा बांधव मुंबईत आले होते. आंदोलकांसाठी सुविधा उपलब्ध करून देताना प्रशासनाला अडचणी आल्या. आता बंजारा समाजानेही मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. १७ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये हे आंदोलन होणार आहे. बंजारा समाजाच्या नेत्यांनी यावर्षी दिवाळी शिवाजी पार्कवरच साजरी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 'मुख्यमंत्र्यांनी आमचा अंत बघू नये' असा इशारा माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी सरकारला दिला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी विविध समाज मुंबईत एकत्र येत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement