Raju Shetti on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील कारवाई योग्यच : राजू शेट्टी
Continues below advertisement
साखर कारखाने विक्री व्यवहार प्रकरणी राजू शेट्टी हे पहिले तक्रारदार आहेत. राजू शेट्टी यांनी पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला सर्वात आधी राजकीय नेत्यांच्या साखर कारखाना खरेदीला आक्षेप घेत हे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य आहे असं सांगत तक्रार दाखल केली होती. ABP माझाचे प्रतिनिधी राहूल कुलकर्णी यांच्याशी चर्चा करताना या विषयांवर राजू शेट्टी यांनी आपले मत पुन्हा मांडले. दिड वर्षापासून शासकीय कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत व १५ टक्केच कामावर येत होते, मग शासकीय कर्मचार्यांना पगार वाढ का? महागाई भत्ता का वाढवला? असा सवाल त्यांनी सरकारला केला. राज्यात सुरु असलेल्या धाडस्त्रावर भाष्य करताना अजित पवार यांच्यावरची करावाई योग्यच आहे असं देखील राजू शेट्टी यांनी म्हटलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement