Rahul Kul On Bhigwan Case : भिगवण प्रकरणातील आरोपांनंतर राहुल कुल यांची पहिली प्रतिक्रिया
Rahul Kul On Bhigwan Case : भिगवण प्रकरणातील आरोपांनंतर राहुल कुल यांची पहिली प्रतिक्रिया
इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात लग्नाची खरेदी करण्यासाठी आपल्या आई आणि भावासोबत गेलेल्या तरूणीचं अपहरण (Bhigwan Kidnapping Case) केल्याची घटना काल (मंगळवारी, ता १७) समोर आली. तरूणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकून दोन तरूणांनी तरुणीचं अपहरण (Bhigwan Kidnapping Case) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी या घटनेवर सविस्तरपणे माहिती दिली आहे, त्यानुसार ते दोघे फोनवरती मेसेजवरती बोलत होते, त्यामुळे आता या घटनेत विविध तर्क वितर्क लावले जात आहे, त्या तरूणीचं अपहरण झालं की प्रेमप्रकरण होतं, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.(Bhigwan Kidnapping Case) अशातच महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या तरूणीमध्ये आणि अपहरण केल्याचा आरोप आहे त्या तरूणामध्ये फोनवरून, मेसेजवरून कॉल आणि मेसेजवरून बोलणं झाल्याची माहिती समोर आली आहे.(Bhigwan Kidnapping Case)
Bhigwan Kidnapping Case: दीड महिन्यात तरुणाशी 11 वेळा बोलली, मुलीने 8 वेळा मेसेज पाठवला
अपहरण झालेली मुलगी आणि ज्याच्यावर अपहरणाचा आरोप आहे त्या तरुणामधे मागील दिड महिन्यात अकरा वेळा संपर्क झाला आहे. यातील तीन वेळा अपहरणाचा आरोप असलेल्या मुलाने मुलीला फोन केला असून आठ वेळा मुलीने मुलाला एसएमएस केले आहेत. आरोपी मुलाने केलेले हे फोन मध्यरात्री उशीरा केलेले आहेत. या तीन कॉलचे ड्युरेशन अवघे तीन ते पाच सेकंद इतकेच आहे.
मात्र त्यानंतर लगेचच त्यांच्यामध्ये व्हॉटसॲप कॉल सुरू झाले आहेत. या व्हॉटसॲप कॉलचे डिटेल्स आणि व्हॉटसॲप चॅटचे डीटेल्स मिळविण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत अशी माहिती समोर आली आहे.




















