Vote Chori: 'PM Modi-Amit Shah यांनी लोकशाही उध्वस्त केली', Rahul Gandhi यांचा 'Brazilian Model' वरून हल्लाबोल
Continues below advertisement
काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत मोठ्या घोटाळ्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 'मुख्य निवडणूक आयुक्त, पीएम मोदी आणि अमित शहा यांनी देशाची लोकशाही उध्वस्त केली आहे', असा थेट आरोप राहुल गांधींनी केला आहे. पत्रकार परिषदेत, गांधींनी दावा केला की हरियाणाच्या मतदार यादीत एका 'ब्राझिलियन मॉडेल'चा फोटो वापरून तब्बल २२ वेळा वेगवेगळ्या नावांनी नोंद करण्यात आली आहे. इतकेच नाही तर, राज्यात एकूण २५ लाख मते चोरण्यात आल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला. या आरोपांमुळे येणाऱ्या बिहार निवडणुकीतही अशाच प्रकारे मतचोरी होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. भाजपने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत, तर निवडणूक आयोगाने हे दावे निराधार असल्याचे म्हटले आहे कारण काँग्रेसने मतदार यादीवर वेळेवर कोणताही आक्षेप घेतला नव्हता.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement