एक्स्प्लोर
Mumbai Hostage Crisis: सामाजिक कार्यकर्ता Rohit Arya च्या संघर्षाचा अंत असा का झाला? Special Report
पुण्यातील (Pune) सामाजिक कार्यकर्ता रोहित आर्य (Rohit Arya) याने मुंबईतील पवईमध्ये (Powai) १७ शाळकरी मुलांना ओलीस धरले होते, ज्यानंतर पोलीस एन्काऊंटरमध्ये (Police Encounter) त्याचा मृत्यू झाला. 'आम्ही पत्रकार भवनच्या इथे एक बेशुद्ध अवस्थेत व्यक्ती बघितला, वाचल्यावर कळलं की तो माणूस १६-१७ दिवस उपोषण करत आहे,' असे सुरज लोखंडे यांनी रोहितच्या पुण्यातील आंदोलनाविषयी सांगितले. रोहितने शाळा सुधारण्यासाठी केलेल्या कामाचे पैसे सरकारकडून थकल्याने त्याने आंदोलन आणि उपोषण केले होते. मात्र, पैसे न मिळाल्याने निराश होऊन त्याने मुंबईत मुलांना ओलीस ठेवण्याचे टोकाचे पाऊल उचलले, जे त्याच्या एन्काऊंटरने संपले. शुक्रवारी मध्यरात्री पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत फक्त पाच नातेवाईकांच्या उपस्थितीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एक सामाजिक कार्यकर्ता ते एन्काऊंटरमध्ये मारला गेलेला गुन्हेगार, हा त्याचा प्रवास अनेकांना धक्का देणारा ठरला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
व्यापार-उद्योग
मुंबई
Advertisement
Advertisement


















