एक्स्प्लोर
Maharashtra Rain Loss : 'अवघे 2 रुपये 30 पैसे!', Palghar मधील शेतकरी Madhukar Patil सरकारवर संतप्त
पालघरमधील (Palghar) वाडा तालुक्यातील शेतकरी मधुकर बाबुराव पाटील (Madhukar Baburao Patil) यांना मिळालेल्या तुटपुंज्या नुकसान भरपाईमुळे संतापाचे वातावरण आहे. 'सरकार हे शेतकऱ्यांची चेष्टा करतंय का?', असा सवाल पाटील यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीनंतर प्रधानमंत्री फसल योजनेच्या (Pradhan Mantri Fasal Yojana) माध्यमातून पाटील यांच्या बँक खात्यात केवळ २ रुपये ३० पैसे जमा झाले. राज्यभरात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी सरकारी मदतीच्या अपेक्षेत असताना, या प्रकारामुळे शासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाडा तालुक्यातील सेल्लोत्तर येथील रहिवासी असलेल्या मधुकर पाटील यांच्या नावावर ११ एकर जमीन असून, या तुटपुंज्या मदतीमुळे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना निर्माण झाली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















