एक्स्प्लोर
Rani Baug Closure: 'पहिला Public ला Inform केलं पाहिजे', ऐन दिवाळीत पर्यटक संतप्त
ऐन दिवाळीच्या सुट्टीत मुंबईतील बाईकाळ्याची राणीची बाग (Veer Mata Jijabai Bhosale Udyan) अचानक बंद ठेवल्याने बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांची आणि मुंबईकरांची मोठी निराशा झाली. जळगाववरून आलेल्या एका संतप्त पर्यटकाने, 'यांनी पहिला Public ला Inform केलं पाहिजे,' अशी थेट प्रतिक्रिया दिली. दर बुधवारी देखभालीसाठी बंद असणारी राणीची बाग, या आठवड्यात बुधवारी खुली ठेवून शुक्रवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने वेळेवर माहिती न दिल्याने, खास दिवाळीच्या सुट्टीत आपल्या मुलांना फिरायला आणलेल्या कुटुंबांना बागेच्या दारातूनच परतावे लागले. पुणे, रत्नागिरी आणि जळगावसारख्या दूरच्या शहरांमधून आलेल्या पर्यटकांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रिकेट
ऑटो
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement















