Heavy Rain Alert : कोकणात अतिवृष्टीचा इशारा; रायगड-रत्नागिरीला Red Alert
मुंबई : मान्सूनने कोकणाचा संपूर्ण भाग व्यापला असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग मान्सूनची एन्ट्री झाल्याचं दिसून आलं आहे. राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तास चारही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचसोबत संपूर्ण कोकणमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पुढील दोन ते तीन दिवस मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे असून अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, घाट परिसरातून जाताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट असून काही ठिकाणी 100 मिमीहून अधिक पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील अमरावती, गोंदिया, भंडारा आणि नागपुरात देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सातारा आणि पुण्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे
Mumbai Rain News Update : मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये रेड अलर्ट
मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर कोकणातील काही भागात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गुजरात परिसरात पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

















