Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील 32 तासांच्या कोंडीतील वाहनांना टोलची रक्कम रिफंड
Mumbai-Pune Expressway Toll: मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवर 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण वाहतूक कोंडीनंतर आता वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. तब्बल 1.2 लाख प्रवाशांना सुमारे 5.16 कोटींचा टोल परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा परतावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मार्फत देण्यात येणार असून, येत्या काही दिवसांत संबंधित वाहनचालकांच्या FASTag खात्यांमध्ये थेट जमा केला जाणार आहे.
Mumbai-Pune Expressway Toll: 32 तास वाहतूक ठप्प
3 फेब्रुवारी रोजी खोपोली परिसरात गॅस टँकरचा अपघात झाला होता. या घटनेनंतर एक्स्प्रेस वेवर आणि जवळच्या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. तब्बल 32 तासांपेक्षा अधिक काळ वाहनांची लांबलचक रांग लागली होती. हजारो प्रवासी अडकून पडले होते आणि अनेकांना पाणी, अन्न तसेच इतर मूलभूत सुविधांचा अभाव सहन करावा लागला.
Mumbai-Pune Expressway Toll: टोल थांबवण्याचे आदेश
अपघातानंतर प्रशासनाने तातडीने टोल वसुली थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र तोपर्यंत काही वाहनधारकांच्या FASTag खात्यांतून टोलची रक्कम वजा झाली होती. याच व्यवहारांची माहिती तपासून आता ती रक्कम परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. MSRDC च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदेश दिल्यानंतरही ज्या वाहनधारकांकडून टोल वसूल झाला आहे, त्या सर्वांना पूर्ण परतावा दिला जाणार आहे.
Mumbai-Pune Expressway Toll: दोन्ही महामार्गांचा समावेश
परताव्यात मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवर तसेच पुणे–बंगळुरू महामार्ग या मार्गांवरील टोलचा समावेश असणार आहे. टोल वसुली करणाऱ्या IRB Infrastructure Developers या कंत्राटदार कंपनीकडून FASTag व्यवहारांचा तपशील मागवण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, टोल नाक्यांवरील बॅरिअर्स पूर्णपणे उघडण्यापूर्वी काही व्यवहार आपोआप प्रक्रिया झाले असण्याची शक्यता आहे. अशा सर्व व्यवहारांचा डेटा तपासून संबंधित प्रवाशांना पैसे परत दिले जाणार आहेत.




















