Mumbai Hostage Crisis: 'मी मंत्री नव्हतो, बोलून काय झालं असतं?', Rohit Arya प्रकरणी Deepak Kesarkar यांचा सवाल

Continues below advertisement
मुंबईच्या पवईमधील (Powai) एका स्टुडिओमध्ये रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने १७ मुलांना ओलीस ठेवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माजी मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मुलांना वेठीला धरून अशा संवेदनशील प्रकरणात मला फोन करणं आणि मुलांना काहीतरी केलं असतं तर अडचणीचं ठरलं असतं,' असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. आरोपी रोहित आर्य याने 'अ थर्सडे' (A Thursday) या यामी गौतमच्या (Yami Gautam) चित्रपटातून प्रेरणा घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. चित्रपट निर्माता असल्याचे भासवून आर्य याने अभिनेत्री रुचिता जाधव, गिरीश ओक आणि उर्मिला कानेटकर-कोठारे यांच्याशी संपर्क साधला होता. मुलांना ओलीस ठेवल्यानंतर आपल्याला दीपक केसरकर यांच्याशी बोलायचे आहे, अशी मागणी त्याने पोलिसांकडे केली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola