एक्स्प्लोर
Farmers' Agitation : 'मानपान सोडून एकत्र या, तरच न्याय मिळेल', Manoj Jarange-Patil यांचा इशारा
मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आवाज उठवला असून शेतकरी संघटनांना (Farmer Unions) एकजुटीचे आवाहन केले आहे. 'शेतकरी दोन गटात दिसू नये, एकजुटीने लढा दिला तरच न्याय मिळेल', असे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. सध्या नागपूरमध्ये (Nagpur) बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जरांगे पाटील नागपूरकडे रवाना झाले आहेत. 'जेव्हा अटीतटीची वेळ असते, तेव्हा आपण शेतकऱ्यांसाठी सहकार्य केलं पाहिजे,' असे सांगत त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. यापूर्वी, जरांगे यांनी भाऊबीजेच्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ऐतिहासिक आंदोलन उभारण्याची घोषणा केली होती, ज्यामध्ये कर्जमुक्ती आणि हमीभाव हे प्रमुख मुद्दे असतील. नागपूरमधील आंदोलनामुळे दोन गट दिसू नयेत म्हणून त्यांनी २ नोव्हेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे बोलावलेली बैठक पुढे ढकलली आहे.
महाराष्ट्र
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
Advertisement






















