Maharashtra Politics'माझ्या हत्येची सुपारी दिली', Manoj Jarange यांचा Dhananjay Munde यांच्यावर आरोप
Continues below advertisement
मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 'धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची अडीच कोटींची सुपारी दिली', असा थेट आरोप जरांगे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांच्या मते, गाडीचा अपघात घडवून त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता आणि यासाठी आरोपींची मुंडे यांच्याशी वारंवार भेट झाली होती. या कटात मुंडे यांचे स्वीय सहाय्यक 'कांचन' नावाच्या व्यक्तीचा सहभाग असल्याचा दावाही जरांगे यांनी केला आहे. भाऊबीजेच्या दिवशी आणि संभाजीनगरजवळील झालटा फाटा येथे मुंडे आरोपींना भेटल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे मराठा आरक्षण आंदोलनाला नवे वळण लागले असून, राजकीय वातावरण तापले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement