Mahayuti Conflict : महायुतीत मोठी धुसफूस, भाजप नेत्यांकडून डिवचणी, शिवसेनेकडून स्वबळाचे नारे
Continues below advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रात महायुतीत मोठी राजकीय धुसफूस सुरू झाली आहे, ज्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील तणाव अनेक जिल्ह्यांमध्ये समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अनेक ठिकाणी भाजपा नेत्यांकडून दिवसेंदिवस त्रास सुरू असल्याने शिवसेनेतही स्वबळाचे नारे जोर धरू लागले आहेत'. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक आणि सांगलीसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये दोन्ही पक्षांकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले आहेत. नाशिकमध्ये छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वादात भाजपने 'शंभर प्लस'चा नारा देत वादाला फोडणी दिली आहे. तर ठाण्यातही गणेश नाईक आणि संजय केळकर यांनी स्वबळाचा नारा दिल्याने तणाव वाढला आहे. या जिल्हास्तरीय अहवालानंतर युतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरच घेतला जाईल, असे समजते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement