Maharashtra : राज्यात धार्मिक वातावरण कोण बिघडवतंय? ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीतली जहांगीरपुरीमधील धार्मिक हिंसाचाराची घटना ताजी असताना आता राज्यातही चाललंय काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेय. कारण धार्मिक वादातून अमरावतीच्या अचलपूर आणि परतवाडा शहरात आणि राजधानी मुंबईच्या आरे कॉलनीत काल रात्री वाद शिगेला पोहोचला.. अचलपूर शहरातल्या दुल्ला गेट परिसरात झेंडा हटवण्याच्या वादातून दोन गट आमने सामने आले.. पोलिसानी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वाद निवळला सध्या या परिसरात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आलेय. तर इकडे मुंबईच्या आरे कॉलनीत शिव कलश यात्रेच्या मिरवणुकीत दोन गटात वाद झाला.. आणि त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील २५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.