एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'मुंबईत एकत्र, राज्यात वेगळं', CM Devendra Fadnavis यांचा स्वबळाचा नारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल (Local Body Elections) महायुतीची रणनीती स्पष्ट केली आहे, तर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी जागावाटपाच्या प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, 'ठाणे, पुणे, पिंपरी, चिंचवडला भाजप स्वबळावर लढेल. जिथे मित्र पक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथे वेगळं लढवू'. मुंबईत मात्र महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निकालानंतर पुढची रणनीती ठरवू असेही ते म्हणाले. मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्यांना त्यांच्याच पद्धतीने पुरावे देऊन उत्तर देऊ, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. तूर्तास वर्षभर राज्यातच राहणार असून, दिल्लीत जाण्याचा विचार २०২৯ नंतर करू, असे सांगत त्यांनी केंद्रीय राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. दुसरीकडे, मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री आणि संपर्कमंत्री जागावाटपावर चर्चा करून अहवाल राज्य समन्वय समितीला देतील, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















