एक्स्प्लोर
Devendra Fadnavis on Mahayuti :मुंबईत महायुती, राज्यात स्वबळाचा नारा; फडणवीसांची नवी रणनीती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महायुतीची रणनीती स्पष्ट केली आहे. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगवेगळी समीकरणं जाहीर केली. फडणवीस म्हणाले, 'मुंबईमधे एकत्र, राज्यामधे वेगळं लढवून एकत्र येणार'. यानुसार, मुंबई महानगरपालिकेत भाजप-शिवसेना महायुती म्हणून एकत्र लढणार असून महापौर युतीचाच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ठाणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या ठिकाणी भाजप स्वबळावर लढणार आहे. जिथे मित्रपक्षच एकमेकांचे स्पर्धक आहेत, तिथे वेगवेगळे लढून निकालानंतर एकत्र येण्याचा विचार केला जाईल, असेही ते म्हणाले. मतदार याद्यांमधील गोंधळाच्या आरोपांवरून त्यांनी विरोधकांना पुरावे देऊन उत्तर देणार असल्याचे म्हटले. तसेच, २०२९ पर्यंत महाराष्ट्रातच राहणार असून दिल्लीत जाण्याचा विचार त्यानंतरच करू, असे सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















