Farmer Protest:'जून २०२६ पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊ',मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
Continues below advertisement
नागपूरमधील शेतकरी आंदोलनावर तोडगा निघाला असून शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. ‘तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी संदर्भात अंतिम निर्णय घेऊ’, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी नेत्यांना दिलं आहे. यानंतर, सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बैठक सुरू असतानाच सरकारने या समितीचा जीआर (GR) जारी केला. ही समिती सरकारला कर्जमाफीसाठी शिफारसी सुचवणार असून, येत्या सहा महिन्यांत समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement