Farmers' Protest: 'बैठकीलाच येत नाही, हे योग्य नाही'; Raju Shetty, Bachchu Kadu यांच्या गैरहजेरीवर सरकार संतप्त
Continues below advertisement
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बोलावलेली उच्चस्तरीय बैठक अखेर रद्द झाली आहे. 'आम्ही दीड तास वाट पाहिली, पण बैठकीला कोणीच आले नाही, हे चित्र योग्य नाही,' असा संतप्त सवाल सरकारने केला आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांसह संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार होते. सरकारने शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली असतानाही, नेते चर्चेसाठी न आल्याने हे केवळ राजकारण आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नेते आंदोलनात बसले असले तरी, त्यांच्यापैकी प्रतिनिधी चर्चेसाठी येऊ शकले असते, असे सरकारने म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement