Uddhav Thackeray : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची उद्धव ठाकरेंना तिसऱ्यांदा नोटीस
Continues below advertisement
२०१८ च्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तिसरी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ठाकरे यांनी कागदपत्रे सादर करण्याबाबतच्या अर्जावर प्रतिक्रिया न दिल्यामुळे, 'तुमच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट का जारी करू नये?' असा प्रश्न विचारत आयोगाने ही नोटीस बजावली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या अर्जानुसार, जानेवारी २०२० मध्ये शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र दिले होते. त्या पत्रानुसार, काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांचा कोरेगाव भीमा हिंसाचारात सहभाग असल्याचा दावा करण्यात आला होता. यापूर्वी दोनदा नोटीस देऊनही उत्तर न मिळाल्याने, आयोगाने ठाकरे यांना २ डिसेंबर रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement