Jellyfish Alert: 'किनारी येऊ नका', Ratnagiri त Lion's Mane जेलीफिशचा धोका, पर्यटकांना इशारा!
Continues below advertisement
रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या संख्येने लायन्स मेन (Lion's Mane) जेलीफिश वाहून आले आहेत, ज्यामुळे प्रशासनाने पर्यटकांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. 'वादळी परिस्थिती, खोल समुद्रात सुटलेले वारे आणि अंतर्गत प्रवाहातील बदलांमुळे जेलीफिश किनारी भागाकडे आलेत,' असे यामागील कारण सांगितले जात आहे. आलेल्या जेलीफिशमुळे नागरिकांनी आणि पर्यटकांनी समुद्रात उतरताना किंवा किनाऱ्यावर फिरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वादळी परिस्थितीचा फटका कोकणातील मच्छीमारांनाही बसला असून, गेल्या काही दिवसांपासून मासेमारी पूर्णपणे ठप्प आहे. यामुळे बाजारात ताज्या मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यासोबतच, अवकाळी पावसामुळे भातशेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. आरेवारे, गणपतीपुळे, माडबन, आणि मालगुंड यांसारख्या प्रसिद्ध किनाऱ्यांवर या जेलीफिशचा वावर दिसून येत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement