Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान
महाराष्ट्र सरकारने मुस्लिम समाजाला दिलेले ५ टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, या सरकारकडे आरक्षणाची मागणी करणे म्हणजे दगडावर डोके फोडण्यासारखी अवस्था असल्याचे जलील म्हणाले. आतापर्यंत स्थापन झालेल्या विविध समित्यांच्या अहवालांमध्ये मुस्लिम समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. मात्र या अहवालांचे कायद्यात रूपांतर करण्याची जबाबदारी सरकारने पार पाडली नाही. कारण या सरकारला मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचेच नाही, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आरक्षणाला पाठिंबा दर्शवला होता, मात्र त्यांनी कोणतेही ठोस आणि विधायक पाऊल उचलले नाही. संख्याबळ नसल्याचे कारण देत त्यांनी हे आरक्षण कायद्यात रूपांतर होऊ दिले नाही, असा आरोपही जलील यांनी केला. मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला आम्ही समर्थन दिले होते, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. मुस्लिम समाजातही अनेक घटक आहेत ज्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे, असे ते म्हणाले. यासाठी आता समाजातील सर्व धर्मगुरूंनी एकत्र येणे आवश्यक आहे. बीडमध्ये निवडणूक काळात ज्या मौलानांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करण्याचा निर्णय घेतला होता, तीच राष्ट्रवादी काँग्रेस आज सत्तेत आहे. त्यामुळे त्या मौलानांनी आता रस्त्यावर उतरून आंदोलन करावे, असे आवाहनही इम्तियाज जलील यांनी केले आहे... काय आहे त्यांची मते याबाबत चर्चा केली आहे आमची प्रतिनिधींनी निशांत भद्रेश्वर यांनी





















