Maharashtra : राज्य सरकारला दणका, सीबीआयविरोधातील याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Dec 2021 06:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई उच्च न्यायालयानंही राज्य सरकारला दणका दिलाय..राज्य सरकारनं सीबीआयविरोधात केलेली याचिका उच्च न्यायालयानं फेटाळलीय..सीबीआयला सर्व बाजूंनी तपास करण्याची मुभा असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलंय.. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयनं चौकशीसाठी समन्स बजावलं होतं... आणि याविरोधात राज्य सरकारनं केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलीय.... अनिल देशमुख प्रकरणात सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांची चौकशी करण्याची मुभा मुंबई हायकोर्टानं सीबीआयला दिलीय... तर दुसरीकडे कुंटे आणि पांडे यांना वैयक्तिक समन्स असताना राज्य सरकारनं त्यांच्यासाठी याचिका दाखल करणं अयोग्य आहे... असे खडेबोल देखील राज्य सरकारला सुनावलेयत..