Bacchu Kadu Protest :'मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करणार', Bachchu Kadu यांचा सरकारला अल्टिमेटम
Continues below advertisement
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी नागपुरात (Nagpur) हजारो शेतकऱ्यांसह आंदोलन पुकारले आहे. आंदोलकांनी नागपूर-हैदराबाद आणि नागपूर-वर्धा यांसारखे प्रमुख महामार्ग रोखून धरले आहेत. 'आज दुपारी बारा वाजेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करण्याचा इशारा बच्चू कडूननी सरकारला दिला आहे.' हजारो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले असून, नागपुरातील चार महामार्ग अडवण्यात आले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास महामार्गांनंतर थेट 'रेल रोको' आंदोलन सुरू करण्याची घोषणाही कडू यांनी केली आहे. या आंदोलनामुळे नागपूरकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement