Farmer Long March : शेतकरी लॉंग मार्चच्या ठिकाणी पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांचे हाल
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेतकऱ्यांचं लाल वादळ एक एक पाऊल टाकत मुंबईच्या दिशेने सरकतंय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकपासून विधानभवनाकडे निघालेलं पायी वादळ आता मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात पोहचलाय.. मोर्चाचा आजचा पाचवा दिवस आहे... ठाणे जिल्ह्यातील कळम इथून मोर्चाला पुन्हा सुरुवात होणार आहे.. दरम्यान कळम येथे पावसाला सुरुवात झाल्याने मोर्चेकऱ्यांचे हाल झालेत... पावसामुळे मोर्चेकरी वाहनांचा आडोसा घेतायत... दरम्यान या मोर्चावर तोडगा काढण्यासाठी सरकारही चर्चा करतंय... आज दुपारी 3 वाजता मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबधित खात्याचे मंत्री, सचिव यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी जे पी गावीत यांच्यासोबतच शेतकऱ्यांचं शिष्ठमंडळही जाणार आहे. बैठकीत समाधान झालं तर मोर्चा थांबवू अन्यथा आमचा मोर्चा विधानभवनावरच थांबेल असा इशारा जे पी गावीत यांनी दिलाय. त्यामुळे हे लाल वादळ शांत होणार का? याकडे लक्ष लागलंय..