एक्स्प्लोर
Zero Hour : ‘सातबारा कोरा करणार म्हणालात, मग मुहूर्त कशाला?’, नेते Vijay Jawandhiya संतापले
शेतकरी नेते विजय जावंदिया (Vijay Jawandhiya) यांनी कर्जमुक्ती (loan waiver) आणि हमीभावाच्या (MSP) मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'निवडणूक जिंकण्यापुरतं राजकारण करायचं असेल तर सांगा तसं आम्हाला, आम्ही तुम्हाला काही मागायला येणार नाही,' असा संतप्त सवाल जावंदिया यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, त्याची आठवण त्यांनी करून दिली. सध्या बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात कर्जमुक्तीसाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. सरकारने चर्चेचे निमंत्रण दिले असले तरी, पूर्वीच्या बैठकांमधून काहीही निष्पन्न झाले नाही, असे जावंदिया म्हणाले. सोयाबीनला सहा हजार रुपये क्विंटल भाव देण्याच्या आणि एमएसपीवर २० टक्के बोनस देण्याच्या आश्वासनांचे काय झाले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वाढलेला उत्पादन खर्च आणि शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने केवळ बैठका न घेता दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
भारत
क्रिकेट
Advertisement
Advertisement

















